गुरु कैलास परिक्रमेला जायचं ठरवतो. बरोबर येण्यासाठी काही खास मित्रांनाही आग्रह करतो. आठ जणांच्या त्या गटात गुरुवगळ्ता कुणीच कुणाला ओळखत नसतं. प्रवासाला सुरुवात होते आणि हळुवारपणे प्रत्येकाच्या अव्यक्त आठवणींचा खजिना उघडत जातो. 'अव्यक्त' हा कैलास परिक्रमेदरम्यान उलगडत गेलेला असाच आठवणींचा खजिना आहे. वेगवेगळ्या पदावर काम करणाऱ्या तरुणांनी रुटीनमधून बाहेर पडून आपल्या मनात दडून ठेवलेल्या आठवणींचा खजिना वाचकांपुढे रिता केला आहे.