संसाराचा वीट येणं हे वैराग्य नव्हे! खरा वैराग्यशील मनुष्य हा वैयक्तिक जीवनात अभिलाषशून्य राहून समष्टीसाठी प्रचंड उत्साहाने आणि विजिगीषू वृत्तीने कार्मरत रहातो! त्याला संपूर्ण विश्व जाणून घ्यायचं असतं... ब्रह्माच्या कानाकोपर्यातून तो ज्ञान मिळवत असतो. तो जे काही करतो ते मनापासून करतो. त्याला मनःशुद्धीसाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. श्वासोच्छ्वासासाठी का कधी प्रयत्न करावे लागतात? तो नित्य समाधानी असतो आणि म्हणूनच त्याला समाधी साधते.
प्रचंड प्रयत्नशील असणारा यति ते सहजसमाधीत अवतीर्ण झालेला सिद्ध यांच्यातला प्रवास समजावून सांगणारं पातंजल योगशास्त्र हे आचरणाचं शास्त्र आहे- पाठांतराचं नव्हे! ते गांधर्वीय ज्ञान आहे; मानवी नव्हे! ते उत्क्रांतीचं शास्त्र आहे!! आथर्वण गंधर्वाने पतंजली मुनींना उपदेशिलेलं अवघ्या विश्वाला एकाच माळेत गुंफणारं हे सूत्र आहे.
योगमार्गाचं शास्त्रशुद्ध आचरण कसं करावं हे सांगणारं अभ्यासपूर्ण पुस्तक.