कवितासंग्रह.
हा कवितासंग्रह इतर कवयित्रींच्या संग्रहापेक्षा वेगळा संग्रह आहे. मराठीत साधारणतः नवर्याच्या तक्रारी, स्त्री जातीवर पुरुषांनी केलेला अन्याय, धुण्या-भांड्यावालीबद्दल मनात नसतानाही आलेली कणव, सावित्रीबाईंच्या बद्दल काहीही माहिती नसताना आम्ही तुझी परंपरा घेऊन स्वतःची वाटचाल करतो आहोत अशाप्रकारचे विषय असतात. तशी एकही कविता या संग्रहात नाही. कित्येक कवितांचे विषय इथे वेगळे आहेत. तथापि, पारंपरिक विषयांपासून कवयित्री फारकत घेते असंही नाही. परंपरा सांभाळत ती नवतेचं स्वागत करते.